rajkiyalive

SHAKTIPITH MAHAMARG : देवूूूदेवतांच्या नावावर 12 हजार कोटीचा घोेटाळा करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग

जयसिंगपूर/ जनप्रवास
रत्नागिरी- नागपूर हा महामार्ग या शक्तीपीठ महामार्गाला समांतर असल्याने केवळ देव देवतांच्या नावाखाली राज्य सरकारने भूमी अधिग्रहण व रस्ते बांधकामात 12000 कोटी पेक्षा अधिक रक्कमेचा घोटाळा करण्यासाठी हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा अट्टाहास धरलेला आहे.अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली.

 

SHAKTIPITH MAHAMARG : देवूूूदेवतांच्या नावावर 12 हजार कोटीचा घोेटाळा करण्यासाठी शक्तीपीठ महामार्ग

राजू शेट्टी यांचा घणाघात

रत्नागिरी -नागपूर या महामार्गावरती शक्तिपीठ महामार्गांमधील दाखविण्यात आलेले विविध तीर्थक्षेत्रे असताना सरकारने 86 हजार कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर करून हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या खिशावरती दरोडा टाकण्यातला प्रकार होणार आहे. केंद्र सरकारने रत्नागिरी- नागपूर महामार्गाचे काम पूर्ण केले. सध्या या महामार्गावरती प्रत्येक 60 किलोमीटर ला टोल नाका लावण्यात आलेला आहे.

मिरज पासून ते लातूर नांदेड पर्यंत या महामार्गावरील टोलची सद्य परिस्थिती पाहता प्रकल्पाचा झालेला खर्च व टोल मधून जमा होणारी मिळकत यामध्ये मोठी तफावत आहे. सरकारने ठेवलेल्या अपेक्षा पेक्षा खूपच कमी टोल गोळा होऊ लागलेला आहे. यामुळे रत्नागिरी -नागपूर या महामार्गाची टोलची मुदत ही नियोजित मुदतीपेक्षा 10-20 वर्षे जादा टोल वसुली करावी लागेल अशी शक्यता वाटू लागली आहे.अशातच राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाकडून शक्तीपीठ महामार्गाची अत्यंत घाईगडबडीत राज्यपालांच्या सहीने अधिसूचना जारी केली आहे. याबरोबरच महामार्गाचा संभाव्य नकाशा व यामध्ये संपादित होणार्‍या जमिनीचे गट नंबर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

राज्य सरकारने हा अनागोंदी कारभार करत असताना वस्तुस्थितीचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित होते. सध्याच्या महामार्गावर होणारी वाहतूक व पुढील पंचवीस वर्षांमध्ये होणारी वाहतुकीतील वाढ, या रस्त्यावरती होणारा खर्च तसेच दोन्ही प्रकल्पाच्या झालेल्या खर्चाची वसुली होण्यासाठी लागणारा कालावधी या संदर्भातला कोणताच अभ्यास राज्य सरकारने केलेला नाही.

शक्तिपीठ महामार्गातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नद्यांवरती होणार्‍या पुलामुळे महापुराची परिस्थिती गंभीर होणार आहे. जवळपास 25 ते 30 गावांना या पुराचा फटका बसणार असून हजारो एकर शेती नापीक होण्याची शक्यता आहे.राज्य सरकारने सवंग लोकप्रियतेसाठी शेतकर्‍यांना भूमीहीन करुन शेतकर्‍यांच्या प्रपंचावर महामार्गाचा बुलडोझर फिरवू नये. यात वीस हजार कोटी रुपये पेक्षा जास्त भ्रष्टाचार करण्याचा डाव आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शक्तीपीठ महामार्गावरील बाराही जिल्ह्यामधून शेतकर्‍यांनी तीव्र विरोध करायला सुरुवात केली असून सरकारने याचा गंभीरपूर्वक विचार करावा अन्यथा सरकारला एक इंच ही जमिन संपादित करू दिली जाणार नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज