rajkiyalive

SANGLI BANK : दुष्काळ निधी अपहारप्रकरणी तिघे निलंबित

ठाणेदारांची उचलबांगडी होणार, संचालकांच्या बैठकीत निर्णय

जनप्रवास । प्रतिनिधी

SANGLI BANK : दुष्काळ निधी अपहारप्रकरणी तिघे निलंबित : सांगली ः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेतील दुष्काळी निधी अपहारप्रकरणी शाखाअधिकारी एम. वाय. हिले, लिपीक योगेश वजरीनकर व निमणी शाखेचे कर्मचारी प्रमोद कुंभार या तिघांना तात्काळ निलंबित करण्यात आले. चौकशीनंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याशिवाय सलग पाच वर्षे एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या कर्मचारी, अधिकारी यांच्या बदल्या करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

SANGLI BANK : दुष्काळ निधी अपहारप्रकरणी तिघे निलंबित

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या बैठक पार पडली. यावेळी उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, मोहनराव कदम, अजितराव घोरपडे, विशाल पाटील, प्रकाश जमदाडे, बाळासाहेब होनमोरे, राहुल महाडीक, मन्सूर खतीब, वैभव शिंदे, सत्यजित देशमुख, सुरेश पाटील, बी. एस. पाटील आदी उपस्थित होते.

कर्मचारी प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदत निधीतील 21 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले.

शासनाकडून मिळालेल्या दुष्काळ मदत निधीवर बॅँकेच्या तासगाव मार्केट यार्ड शाखेत कर्मचारी वजरीनकर याने डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर निमणी शाखेतही असाच प्रकार पुढे आला. या शाखेतील कर्मचारी प्रमोद कुंभार यांनी अवकाळी मदत निधीतील 21 लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले. त्यानंतर संपूर्ण तासगाव तालुक्यातील शाखांची तपासणी सुरु करण्यात आली. अपहार प्रकरणी संचालक मंडळाची सोमवारी तातडीने बैठक घेण्यात आली. त्यात तिघांचेही तात्काळ निलंबन करून फौजदार गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोघा कर्मचार्‍यांनी अपहार तर शाखाधिकारी हिले यांनी कामात हालगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अनेक लाभार्थी शेतकर्‍यांचा कोट्यवधी रुपयांचा मदत निधी बॅँकेत पडून आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या तसेच पिक विम्याच्या मदतीचा निधी वेळो वेळी जिल्हा बॅँकेला दिलेला आहे. हा निधी संबधित लाभार्थी शेतकर्‍यांच्या बॅँक खात्यावर वर्ग केला जातो. मात्र ज्यांची खाती बंद आहेत तसेच अन्य बँकांत खाती आहेत, अन्य कारणांनी अनेक लाभार्थी शेतकर्‍यांचा कोट्यवधी रुपयांचा मदत निधी बॅँकेत पडून आहे. बॅँकेच्या विविध शाखांत हा निधी अवकाळी मदत, दुष्काळ निधी व अन्य नावांनी स्वतंत्र खात्यावर ठेवण्यात आला आहे.

लिपीक वजरीनकर याने 59 लाखांचा डल्ला मारला असल्याचे उघड झाले.

त्यांची चौकशी सुरु असतानाच त्यांचेच एकेकाळचे सहकारी निमणी (ता. तासगाव) शाखेतील लिपीक प्रमोद कुंभार यांनी निमणी शाखेतील अवकाळी मदत निधीवर सुमारे 21 लाखांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. सिध्देवाडी शाखेतही असाच प्रकार घडल्याची तक्रार आली. त्यानंतर तालुक्यातील सर्वच शाखांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले .

दरम्यान त्याशिवाय पाच वर्षे पूर्ण झालेले तात्काळ आणि तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकारी, कर्मचार्‍यांच्या जुलैमध्ये बदल्या करण्यात येणार आहेत. त्याशिवाय जिल्ह्यातील सर्वच शाखांची तपासणी होणार आहे. त्यासाठी 48 अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तपासणी अहवाल आल्यानंतर संबंधित दोषीवर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाखांची तपासणी ः आ. मानसिंगराव नाईक

जिल्हा बँकेत विविध शासकीय योजनांचा निधी जमा होतो. त्यावर यापूर्वी सबंधित शाखा प्रमुखांचे नियंत्रण ठेवले जायचे. त्यावर सध्या मुख्यालयाचेच या निधीवर नियंत्रण राहिल. मुख्यालयाच्या परवानगीशिवाय त्या खात्यावर व्यवहारच होणार नाहीत, याची काळजी घेतली जाईल. अशा घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाखांची तपासणीचा निर्णय घेतल्याचे बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज