rajkiyalive

JAYSINGPUR CRIME NEWS : कोथळीत दोन गटात मारामारी, सहा जखमी ;परस्पराविरोधी गुन्हा नोंद

जयसिंगपूर/ प्रतिनिधी

JAYSINGPUR CRIME NEWS : कोथळीत दोन गटात मारामारी, सहा जखमी ;परस्पराविरोधी गुन्हा नोंद : कोथळी (ता. शिरोळ) येथे नंदीवाले वसाहत परिसरात दोन गटात चाकू आणि काठीच्या सहाय्याने झालेल्या मारामारीत सहा जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परा विरोधात सहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

JAYSINGPUR CRIME NEWS : कोथळीत दोन गटात मारामारी, सहा जखमी ;परस्पराविरोधी गुन्हा नोंद

दरम्यान या घटनेत परसू रायाप्पा नंदीवाले, राकेश चिन्नाप्पा नंदीवाले, चिन्नाप्पा रायाप्पा नंदीवाले, बापू विश्वास नंदीवाले, मानेश्वर विश्वास नंदीवाले, मानेश्वर यशवंत नंदीवाले (सर्व रा नंदीवाले वसाहत कोथळी) अशी जखमी झालेल्या सहा जणांची नावे आहेत.

याप्रकरणी फिर्यादी चिन्नाप्पा नंदीवाले (वय 65) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे. चिन्नाप्पा यांचा मुलगा राकेश व भाऊ परसू असे दोघे घरी होते. यावेळी मानेश्वर नंदीवाले याने माझ्या भाची बद्दल पाहुण्यांना चुकीची माहिती देऊन लग्न का मोडत आहेस असे विचारले यावेळी यांच्यात जोरदार वादावादी झाली.

या वादावादीत संशयित अनिल नामदेव नंदीवाले याने परसु नंदीवाले यांच्या पोटात चाकू मारून गंभीर जखमी केले यावेळी परसू आणि राकेश यांनी चिन्नाप्पा याला काटेच्या साह्याने मारहाण केली.

तर मानेश्वर नंदीवाले यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आपला मेहुना बापू नंदीवाले व मानेश्वर नंदीवाले यांना चिन्नाप्पा मुलगा राकेश हा समजावून सांगण्यासाठी पाठविले असता. त्यांचेच वाद होऊन मानेश्वर याने बापू नंदीवाले यांना वाईट वंगाळ शिवीगाळ करत जवळील चाकूने बरगडीवर मारून जखमी केले.

तर मानेश्वर नंदीवाले याच्या डोक्यात चिन्नाप्पा नंदीवाले याने काठी मारून जखमी केले. असे फिर्यादित म्हटले आहे. याबाबत जयसिंगपूर पोलिसात परस्परा विरोधात गुन्हा नोंद झाला असून पोसई प्रवीण माने तपास करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज