rajkiyalive

sangli crime news : चिंचणीच्या तरुणाला तुरचीच्या तरुणांची बेदम मारहाण, 25 ते 30 जणांचे कृत्य

sangli-crime-news-chinchani-youth-brutally-beaten-by-turchi-youths-act-of-25-to-30-people

जनप्रवास तासगाव:

sangli crime news : चिंचणीच्या तरुणाला तुरचीच्या तरुणांची बेदम मारहाण, 25 ते 30 जणांचे कृत्य : बसस्थानकात शुक्रवारी साडेअकरा ते बाराच्या दरम्यान चिंचणी व तुरची गावच्या तरुणांच्यात फिल्मीस्टाईल राडा झाला. तुरचीच्या 25 ते 30 जणांच्या टोळक्याने चिंचणीच्या तरुणास लाथा व पट्याने फिल्मी स्टाईल पाठलाग करून बेदम मारहाण केली. तरुणाच्या ओरडण्याने प्रवाशी व वाहतूक पोलिसांनी धाव घेताच टोळक्याने धूम ठोकली. या घटनेने काही काळ बस स्थानकामध्ये तणावाचे वातावरण होते. बस स्थानकात कायमस्वरूपी पोलीस नसल्याने मारामारीचे प्रकार वाढल्याची तक्रार प्रवाशांनी केली.

sangli crime news : चिंचणीच्या तरुणाला तुरचीच्या तरुणांची बेदम मारहाण, 25 ते 30 जणांचे कृत्य

शाळा महाविद्यालये सुरू झाल्यानंतर तासगावात महाविद्यालयीन तरुण तरुणीची संख्या वाढत आहे. किरकोळ कारणांवरून खुन्नस देणे, दमबाजी व मारहाणीचे प्रकार सध्या वाढत आहेत. शुक्रवारी सकाळी साडे अकरा ते बारा च्या दरम्यान बस स्थानक आवारात चिंचणी वं तुरचीच्या टोळक्याचा जुना वाद सुरू होता. काही तरुणांनी मध्यस्थी करून वाद मिटवला होता. मात्र अचानक वाद वाढत जाऊन बाचाबाची सुरू झाली.

तुरचीच्या तरुणाने बस स्थानकात घुसत शिवीगाळ करत कॉलर धरून बाहेर आणले. यानंतर बाचाबाची वाढत जाऊन त्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. काही तरुणांनी सदरच्या तरुणास लाथा व पट्ट्याने फिल्मी स्टाईल मारहाण करण्यास सुरुवात केली. माराने तरुण जिवाच्या आकांताने ओरडत होता. त्याच्या आवाजाने प्रवाशांसह बसस्थानका वरील मंडळी व वाहतूक पोलीस यांनी धाव घेतली. यावेळी संबंधित टोळक्याने धूम ठोकली.

बसस्थानकात कायमस्वरूपी पोलीस नसल्याने या प्रकारात वाढ होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही च्या आधारे संबंधित तरुणांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज