rajkiyalive

shirol vidhansabha news : शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने सरासरी 78 टक्के इतके मतदान झाले.

shirol vidhansabha news : शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने सरासरी 78 टक्के इतके मतदान झाले.: शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने सरासरी 78 टक्के इतके मतदान झाले. जयसिंगपुरात रात्री उशिरापर्यंत मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. कुठे वादावादी झाली नाही. मतदानानंतर आता निकालाकडे लक्ष लावून राहिले आहे.

shirol vidhansabha news : शिरोळ विधानसभा निवडणुकीसाठी चुरशीने सरासरी 78 टक्के इतके मतदान झाले.

बुधवारी सकाळी सात वाजता तालुक्यातील ३०७ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. 3 लाख 29 हजार मतदार संख्या असलेल्या शिरोळ तालुक्यात दोन लाख 56 हजार 620 इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यामुळे सरासरी 78% इतके मतदान झाले आहे. सकाळच्या सत्रात ग्रामीण भागात तर दुपारनंतर शहरी भागात गर्दी झाली होती. सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.५३ टक्के तर सकाळी अकरा वाजता २१.४३ टक्के, दुपारी एक वाजता ३७ टक्के तर दुपारी तीन वाजता ५२.६६ टक्के मतदान झाले होते. मतदारांना बाहेर काढण्यासाठी यंत्रणा होती.
 काही गावात मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. विद्यमान आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर, गणपतराव पाटील यांनी जयसिंगपूर येथे तर उल्हास पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळ येथे मतदान केले. तालुक्यात पोलीस फौज फाटा मोठ्या प्रमाणात  तैनात करण्यात आला होता. जयसिंगपूर शिरदवाड सह अनेक ठिकाणी रात्री उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागून राहिल्या होत्या. दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिलकुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया पार पडली. शनिवार दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे. मतदानानंतर तालुक्यात तर्क वितर्क  लढविले जात आहेत. वयोवृद्धानीही मतदानाचा हक्क बजावला. यावेळी जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने या मतदारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. सकाळी शांतपणे असलेले मतदान दुपारच्या सत्रात अचानक मतदान केंद्रावर गर्दी झाल्याचे पहावयास मिळत होते.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज