rajkiyalive

sangli news : सांगलीत माजी नगरसेवकाच्या कुत्र्याने घेतला आठ जणांना चावा…

sangli news : सांगलीत माजी नगरसेवकाच्या कुत्र्याने घेतला आठ जणांना चावा… : सांगली शहरातील एका माजी नगरसेवकाच्या कुत्र्याने गेल्या पंधरा दिवसात सात जणांना चावा घेतला आहे. अनेक वाहनाच्या पाठीमागे देखील कुत्रा धावत असल्याने नागरिकांचे अपघात झाले आहेत. संबंधित नागरिकांनी या संदर्भातील तक्रार माजी नगरसेवकाच्या कुटुंबियाकडे केली, पण या नागरिकांवरच दमदाटी सुरू असल्याचा प्रकार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

sangli news : सांगलीत माजी नगरसेवकाच्या कुत्र्याने घेतला आठ जणांना चावा…

जिल्हा व जिल्हाबाहेरील अनेक नागरिक शहरात कामधंद्यासाठी सांगलीत आले आहेत. सांगली शहरातील विस्तारीत भागात एक कॉलनी अशीच वसली आहे. महापालिकेची विविध यंत्रणांची कार्यालये देखील आता त्याच भागात होऊ लागली आहेत. त्यामुळे विस्तारीत भागात आता गल्ल्या वाढत चालल्या आहेत. त्याच ठिकाणी एका मुख्य रस्त्यावर एका माजी नगरसेवकाचे घर आहे. त्यांच्या घरासमोर एक कुत्रा आहे. त्याच्या गळ्यात पट्टा घालून माजी नगरसेवकाचे कुटुंब त्याला खायला घालत आहे. पण हाच कुत्र्या आता परिसरातील नागरिकांच्या जिवावर उठून हल्ला करत आहेत.

गेल्या पंधरा-वीस दिवसात आठ जणांना या कुत्र्याने चावा घेतला आहे. यामध्ये लहान मुले व वृध्दांचा देखील समावेश आहे. या नागरिकांनी सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालयात लसी देखील घेतल्या आहेत. शिवाय या रस्त्यावर जाणार्‍या अनेक दुचाकीच्या पाठीमागे कुत्रा भुंकत लागत असल्याने अपघात देखील झाले आहेत. संबंधित नागरिकांनी माजी नगरसेवकाच्या कुटुंबियांना या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. कुत्र्याला बाहेर न सोडता घरी बांधावे, असे सांगितले होते.

sangli-news-former-corporators-dog-bites-eight-people-in-sangli

मात्र या नागरिकांवरच दमदाटी केली जात असल्याचा आरोप होत आहे. सांगली शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत चालली आहे. मनपाकडून उपाययोजना केल्या जात नाहीत. अशातच काही पाळीव कुत्री देखील बांधून ठेवली जात नसल्याने रस्त्यावर ये-जा करणार्‍यांवर हल्ले करत आहेत. हा प्रकार चुकीचा आहे. या प्रकरणी आता महापालिकेने दखल घेणे आवश्यक आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज