rajkiyalive

kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये मौजी बंधन उत्साहात

kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये मौजी बंधन उत्साहात :सांगली : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे आदिनाथ दिगंबर जिनमंदिर आणि शांतीनाथ दिगंबर जिनमंदिरच्यावतीने सुरू असलेल्या विधान महोमहोत्सवात बुधवारी तिसर्‍या दिवशी मौजी बंधनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. मौजी बंधनानिमित्त गावात मोठी गर्दी झाली होती.

kasbe digraj news : कसबे डिग्रजमध्ये मौजी बंधन उत्साहात

सकाळच्या सत्रात हत्तीवरून जलकुंभ आणणे, यजमानांची मिरवणूक आदी कार्यक्रम झाल्यानंतर मांडवात लहान मुलांवर संस्कार झाले. त्यानंतर गावातून फिरून मुलांनी भिक्षा देण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. दरम्यान बुधवारी राष्ट्रवादीचे नेते निशिकांत पाटील यांनी सोहळ्यास भेट दिली.

दुपारच्या सत्रात विद्यासागर महाराजांचे मंगल प्रवचन, रात्री मंगल आरती असा भरगच्च कार्यक्रम सुरू आहे. गावामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी स्वागत कमानी, डिजिटल, पंचरंगी झेंड यामुळे गाव सजले आहे. येथील बागणवाटेवर भव्य आणि दिव्य असे मंडप उभारण्यात आले आहे. युवा उद्योजक पिंकू उर्फ प्रशांत अवधूत या दांप्मत्यांना इंद्र इंद्रायणीचा मान मिळाला आहे.

कसबे डिग्रज येथे बर्‍याच वर्षानंतर विधान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 एप्रिल ते 4 मे 2025 अखेर ही पूजा होणार आहे. आचार्य सन्मतीसागरजी महाराज यांचे परमशिष्य आगमचक्रवती विद्यासागरज महाराज, आगमसागरजी महाराज, प्रशांतसागरजी महाराज आदींचे आशीर्वाद यापुजेला लाभले आहे.

kasbe-digraj-news-mooji-bandhan-in-excitement-in-kasbe-digraj

धनपती कुबेर महेश जंबू चौगुले, चक्रवर्ती राकेश रमेश फराटे, महायज्ञनायक प्रकाश आदीनाथ फराटे, ईशान्य इंद्र राजेेंद्र बापू दुधगावे, सुवर्ण सौभाग्यवती प्रियांका प्रकाश चौगुले, ध्वजारोहण सुरेश अनंत चौगुले, मंडप उद्घाटक तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी, अखंड दीपस्थापना आण्णासो कुबेर चौगुले, मंगल कलश स्थापना आण्णासो कुबेर चौगुले, प्रथम दिन जलकंभ आणणे बाहुबली महावीर अवधूत, भरत आळतेकर, श्रेणीक पाटील, आदींनी सवाल धरले आहेत.
विधान महोत्सवासाठी प्रतिष्ठाचार्य संदेश उपाध्ये, संगीतकार सुयोग पाटील दानोळी, रोहित पंडित आदी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज