sangli zp news : जुन्या गट संख्येनुसार निवडणुका होणार, नव्याने काढलेले आरक्षण रद्द होणार: जिल्हा परिषद, महानगरपालिकेसह नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालाने निर्णय दिला आहे. ओबीसींना 2022 पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेवून सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्यात निवडणुका तर चार आठवड्यांच्या आता निवडणुकांसदर्भातील अधिसूचना काढण्याचे आदेश दिले आहेत.
sangli zp news : जुन्या गट संख्येनुसार निवडणुका होणार, नव्याने काढलेले आरक्षण रद्द होणार
जिल्हा परिषद, महापालिकेसह नगरपालिकांचे लवकरच बिगुल
त्यामुळे जिल्हा परिषद, 10 पंचायत समित्या, सांगली महानगरपालिकेसह 6 नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला. आगामी निवडणुका जुन्या गटसंख्येनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांचे काढण्यात आलेले आरक्षण रद्द होईल.
सर्वोच्च न्यायालयाने 2022 मध्ये बांठिया आयोगाचा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाला महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 5 वर्षांपर्यंत निवडणुका झाल्या नसल्याचे न्यायालयाने नमूद केले. ही प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत निवडणूक अधिकार्यांची समिती नियुक्त करुन कार्यवाही करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.
राज्यातील महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुका 2020 च्या जुन्याच प्रभागरचनेनुसार घेतल्या जाव्यात, असे न्यायालयाने आदेश दिले आहेत. एवढच नाही तर निवडणुका सतत पुढे ढकलण्यात आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली होती.
जिल्हा परिषदेच्या सभागृहाची 20 मार्च 2022 मध्ये तर पंचायत समिती सभागृहाची 13 मार्च 2022 मुदत संपली आहे.
निवडणूक लांबल्याने जिल्हा परिषदेवर तीन वर्षापासून प्रशासकाच्या हातात कारभार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत अपेक्षित होता. मात्र ओबीसी आरक्षण, मतदारसंघ पुनर्रचनेचा निर्णय न झाल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लांबणीवर पडल्या. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेवू नयेत, या मागणीवर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप सरकार आग्रही राहिले. त्याबाबतचा निर्णयही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्याच्यावर राज्यपालांनी स्वाक्षरीही केली होती. परंतू न्यायालयात प्रक्रिया सुरु असल्याने निवडणूक लांबणीवर पडली आहे.
तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने जिल्हा परिषदेचे मतदारसंघ वाढविण्याचा निर्णय घेतला होता.
वाढती लोकसंख्या आणि वाढलेले मतदार लक्षात घेता मतदारसंघ वाढले आहेत. नव्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेचे आता 68 मतदारसंघ आणि पंचायत समितीचे गण 136 होणार होते. कडेगाव आणि कवठेमहांकाळ तालुके वगळता उर्वरित आठ तालुक्यात जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक मतदारसंघ वाढणार होता. परंतू जुन्या पुनर्रचनेनुसारच निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा परिषदेचे सध्या 60 गट आहेत, जुन्या प्रभाग पुनर्रचनेनुसारच निवडणूक होणार आहे.
ज्या मतदारसंघांची फोडाफोडी थांबणार असल्याचे स्पष्ट दिसते. जिल्हा परिषद 60 तसेच पंचायत समितीचे 120 गण कायम राहणार आहेत. आटपाडी नगरपंचायत झाल्याने तो गट रद्द होणार आहे. त्यामुळे आटपाडी तालुक्यात 3 जिल्हा परिषदेचे मतदारसंघ राहतील, तर खानापूर तालुक्यात नव्याने एक गट वाढून 4 मतदारसंघ होतील. यापूर्वी जिल्हा परिषदेचे 68 गट गृहित धरुन आरक्षण काढण्यात आले होते, परंतू 60 मतदारसंघ झाल्यास जिल्हा परिषद गटांसाठी फेर आरक्षण काढण्यात येईल.
जुन्या प्रभाग रचनेनुसार जिल्हा परिषदेतील ओबीसीच्या 16 जागा खुल्या गटाला मिळतील. याशिवाय सात जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित राहणार आहेत. त्यामुळे परंपरागत असलेल्या मतदारसंघातील नेते व कार्यकर्त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे चित्र आहे.
sangli-zp-news-elections-will-be-held-according-to-the-old-group-numbers-newly-issued-reservations-will-be-canceled
गट, गणांची पुनर्रचना करावी लागेल ः अॅड बाबासाहेब मुळीक
जिल्हा परिषद महानगरपालिकांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुका होतील, मात्र एकाच टप्प्यात निवडणुका होणे अशक्य आहे. याशिवाय पावसाळा, सणांमुळे निवडणुकांवर परिणाम होवू शकतो.
जिल्ह्यात या संस्थांसाठी होणार धुमधान
– निवडणूक संस्था
– जिल्हा परिषद 1 ः सांगली
– पंचायत समित्या 10 ः वाळवा, मिरज, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, जत
– महानगरपालिका 1 ः सांगली, मिरज व कुपवाड महानगरपालिका
– नगरपालिका 6 ः इस्लामपूर, आष्टा, तासगाव, विटा, पलूस, जत.
– नगरपंचायत 2 ः शिराळा व कडेगाव

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.