tasgaon crime news : आळतेचा ग्रामसेवक चार हजारांची लाच घेताना ताब्यात: तासगाव : राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून विहिर खुदाईचा प्रस्ताव पाठवून तो पूर्ण करेपर्यंत मदत करण्यासाठी 4 हजार रूपयांची लाच घेताना आळते (ता. तासगाव) येथील ग्रामसेवक आलिम यासीन मुजावर (वय 38, रा. तासगाव) याला रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरूवारी दुपारी ही कारवाई केली.
tasgaon crime news : आळतेचा ग्रामसेवक चार हजारांची लाच घेताना ताब्यात
तक्रारदार हे आळते येथील शेतकरी आहेत. त्यांच्या वडिलांचे नावे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर आहे. विहीर खुदाई प्रकल्प प्रस्तावाचा प्राथमिक मागणी प्रस्ताव पाठविण्यासाठी तक्रारदार हे पाठपुरावा करत होते. तेव्हा प्रस्ताव पाठवून कार्यारंभ आदेश काढण्यासाठी तसेच प्रस्तावाची पुढील मस्टर मागणीसाठी, प्रस्ताव पूर्ण होईपर्यंत मदत करतो असे सांगून ग्रामसेवक मुजावर याने 5 हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यामुळे तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने दि. 19 रोजी ग्रामपंचायत कार्यालयसमोरील आवारात पडताळणी केली. तेव्हा ग्रामसेवक मुजावर याने 4 हजार रुपये लाचेची मागणी करून रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 4 हजार रूपये लाचेची मागणी करून पंचासमक्ष रक्कम स्विकारल्यानंतर मुजावर याला रंगेहाथ पकडण्यात आले.
tasgaon-crime-news-village-servant-from-aalta-arrested-while-taking-a-bribe-of-rs-4000
त्याच्याकडून लाचेची रक्कम 4 हजार रुपये, मोबाईल, इत्यादी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या आहेत. मुजावर याला लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सायंकाळी घर झडतीची घेण्यात आली. तसेच तासगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. लाचखोर मुजावर याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. पोलिस उपअधीक्षक अनिल कटके, निरीक्षक किशोरकुमार खाडे, अंमलदार प्रीतम चौगुले, अजित पाटील, रजपूत आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.