rajkiyalive

समडोळीत उसळला भाविकांचा महापूर

दिनेशकुमार ऐतवडे, समडोळी 9850652056

विसाव्या शतकातील प्रथमाचार्य 108 शांतीसागर महाराज यांच्या आचार्यपद शताब्दी महोत्सव आणि येथील 1008 भ. शांतीनाथ जिन मंदिरासही शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त समडोळीत मंगळवारी दसर्‍यादिवशी भव्य आणि दिव्य लक्ष दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. समडोळीत न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमास केवळ समडोळीच नव्हे तर इतर गावातूनही श्र्रावक श्राविकांचा महापूर आला होता. एक लाख दिव्यांनी संपूर्ण गाव उजळले. विशेष म्हणजे यामध्ये एकही समाज आणि एकही घर सुटले नाही.

 (SAMDOLI  ) दसर्‍या दिवशी दिवसभर गावामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात होते. सकाळी समस्थ जैन समाजातर्फे गावातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये रथ, सात घोडे, झांजपथक, बेंड आदींचा समावेश होता. महिला वर्गाची यावेळी जास्त उपस्थित होती.

हेही वाचा

समडोळीतील कमान ठरत आहे लक्ष्यवेधी
समडोळीत यजमानपदाचा मान माणिक खोत यांना
समडोळीत जैन समाजाने घालून दिला आदर्श

समडोळीत शांतीसागर गुंफा शिलान्यासची भव्य मिरवणूक

समडोळी या गावाला अखंड समानतेचा, धार्मिकतेचा, सर्वधर्मसमभावतेचा मोठा वारसा आहे. जैन समाजातील खंडीत झालेली दिगंबर जैन मुनी परंपरा शांतीसागर महाराज यांनी सुरू केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेउन समडोळीतील समस्थ जैन समाजाने येथील शालिनी पाटील मळ्यात त्यांना आचार्य ही पदवी दिली. ही पदवी दि. 8 ऑक्टोंबर 1924 दसर्‍या दिवशी दिली गेली. या कार्यक्रमाास 2024 च्या दसर्‍यादिवशी शंभर वर्ष पूर्ण होणार आहेत. मंगळवारी दसर्‍यापासून शताब्दी वर्ष सुरू झाले.

तसेच आचार्य शांतीसागर महाराज यांच्याच आशीवार्दाखाली आणि त्यांच्या सानिध्यात 1008 भ. शांतिनाथ मंदिराची उभारणीही झाली होती. त्या मंदिरालाही 100 वर्षे पूर्ण होणार आहेत. दसर्‍या दिवशी झालेल्या लक्ष दीपोत्सवाची तयारी एक महिना अगोदरपासून करण्यात येत होती. शांतीनाथ मंदिराच्या ट्रस्टीने यानिमित्त गावातील सर्व घरामध्ये, सर्व समाजामध्ये, सर्व मंदिरांमध्ये, सर्व मंडळांना पणत्यांचे वाटप केले होते. त्याबरोबर वाती आणि तेलाचेही वाटप करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, सन्मती सेवा दलाचे संस्थापक मिहिरभाई गांधी, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललीत गांधी, डी. ए. पाटील, अजित भंडे, शशिकांत राजोबा, एन. जे. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 108 आर्चाय जिनसेन महाराज यांच्या आशीर्वादाने हा संपूर्ण कार्यक्रम झाला.

सर्व ग्रामस्थांनी व युवक मंडळांनी त्यांना दिलेल्या पणत्या घरासमोर सायंकाळी सव्वा सहा वाजता प्रज्वलित केले होते. संपूर्ण गाव पणत्यांनी उजळून निघाला होता. गावामध्ये संपूर्ण समाज मोठ्या उत्साहाने यामध्ये भाग घेतला होता. प्रत्येक मंडळांनी वेगवेगळ्या देखावे सादर केले होते. खोत गल्ली आणि सुतार गल्लीमध्ये दिगंबर महाराजांचे जिंवत देखावे सर्वांचे कौतुकाचे विषय ठरले.

गावातील प्रत्येक रस्त्यावर वेगवेगळे डिझाईन तयार करण्यात आले होते. गावातील मुख्य रस्ता तेवढाच मोकळा होता. या रस्त्यावर भाविकांची गर्दी उसळली होती. गावाबाहेर पार्कींगची सोय करण्यात आली होती. गावातील सर्वच कमानी लक्षवेधक झाल्या होत्या.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज