rajkiyalive

sangli bjp new : लोकसभेची चूक विधानसभेला सांगलीकर सुधारतील

मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा डाव ः भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे

sangli bjp new : लोकसभेची चूक विधानसभेला सांगलीकर सुधारतील : सांगलीत लोकसभा निवडणुकीवेळी झालेली चूक दुरुस्त करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केला. जिनकी जितनी भागीदारी, उनकी उतनी हिस्सेदारी, असा काँग्रेसचा नारा आहे. त्यातून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा डाव असल्याची टीकाही त्यांनी केली.

sangli bjp new : लोकसभेची चूक विधानसभेला सांगलीकर सुधारतील

भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे सोमवारी सांगलीत आले होते, त्यानंतर पत्रकार परिषदेत तावडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, समाज जातीजातीत विभागण्याचा काँग्रेसचा डाव आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेसह विरोधी पक्षांकडून होत आहे. मतांसाठी जनतेला भूलवण्याचे काम विरोधक करत आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक है तो सेफ है’, असा नारा दिल्यानंतर विरोधक त्यांच्यावर तुटून पडले. त्यातून विरोधकांची मानसिकता लपून राहत नाही.

कर्नाटकमध्ये काँग्रेसने ओबीसींचे आरक्षण मुस्लिम समाजाला देत ओबीसींमधील घटकांना हक्कांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. आताही जातनिहाय जनगनणेची मागणी राहुल गांधींकडून होत आहे. त्यामागे त्यांचा मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा डाव आहे.
तावडे म्हणाले, विधानसभा निवडणुकीबाबत दिवाळीपूर्वी जे वातावरण होते, ते दिवाळीनंतर राहिलेले नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय या महायुतीच्या बाजूने वातावरण झाले आहे. जनमताचा कानोसा, सर्वेक्षण अहवाल त्याच दिशेने आहेत. राज्यात किमान 165 जागा महायुतीला मिळतील. जत, सांगली, मिरज या जागांचा आढावा घेतला. भाजप महायुतीला मोठे यश मिळेल, असे चित्र दिसत आहे.

महाविकास आघाडीत जागा वाटपावरून भांडणे झाली. बर्याच ठिकाणी कार्यकर्ते एकमेकांविरोधात काम करत आहेत. महायुतीत जागा वाटपावरून कुरबुरी झाल्या, मात्र त्या शमवण्यात महायुतीला यश आले आहे. सांगली लोकसभा निवडणुकीवेळी झालेली चूक दुरुस्त करण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार निवडून येतील, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला

लाडकी बहिण, किसान सन्मान योजना, वीज बिल माफी, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण विद्यावेतन योजना यासारख्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ झाला आहे. रस्ते, पाणी योजना, मेट्रो तसेच पायाभूत सेवा-सुविधांचा प्रत्येकाला अप्रत्यक्ष लाभ झाला आहे. या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष लाभाचा परिणाम निवडणुकीत जाणवेल, असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.

पवारांची सत्ता आल्यास ‘लाडकी बहिण’ बंद

लाडकी बहिण व बाकीच्या योजना बंद पडतील, असे वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले होते. त्यामुळे राज्यात शरद पवार यांच्या महाविकास आघाडीची सत्ता आल्यास लाडकी बहिण योजना बंद होणार हे स्पष्ट आहे. कर्नाटक, हिमाचल प्रदेशात सत्ता आल्यानंतर काँग्रेसने लाडकी बहिण योजनेपासून पळ काढला. भाजपची सत्ता असलेल्या राज्यात मात्र ही योजना अतिशय चांगल्याप्रकारे सुरू आहे, हे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना ध्यानात घ्यावे, असे आवाहन तावडे यांनी केले.

लाडकी बहिण योजनेसंदर्भात भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भातील प्रश्नावर विनोद तावडे म्हणाले, निवडणूक आयोगाने महाडिक यांना नोटीस दिली आहे. निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. यावेळी भाजप महायुतीचे उमेदवार आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार दिनकर पाटील, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, केदार खाडीलकर उपस्थित होते.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेत मराठ्यांना आरक्षण मिळालेच नाही

मराठा आरक्षणाची मागणी जुनी असताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सत्तेत मराठा समाजाला आरक्षण दिले नाही. भाजपने मात्र 13 टक्के आरक्षण दिले. उच्च न्यायालयात ते टिकले. भाजपची सत्ता असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला धक्का लागला नाही. मात्र ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यंनी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू योग्य प्रकारे मांडली नाही. पुरेशी कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे आरक्षण रद्द झाल्याची टीका राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केली. महायुती सरकारने मराठा आरक्षण दिले आहे. ते सर्वोच्च न्यायालयातही टिकवू.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज