sangli crime news : सांगलीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून केले अत्याचार : 12 लाखांची केली फसवणूक, : शहरातील एका परिसरात राहणार्या तरुणीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून विश्वास संपादन केला. यानंतर सांगली आणि तासगाव येथे तिच्यावर अनेकवेळा अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. तसेच विश्वास संपादन करून तरुणींकडून 12 लाखांची फसवणूक देखील केली.
sangli crime news : सांगलीतील तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून केले अत्याचार : 12 लाखांची केली फसवणूक
इंदापूर येथील तरुणावर गुन्हा दाखल.
सदरची घटना हि जून 2023 ते जानेवारी 2025 या कालावधीत घडली. या प्रकरणी पीडित तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित ऋषिकेश ब्रह्मदेव माळी (रा. इंदापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, पीडित तरुणी हि आपल्या कुटुंबियांसह शहरातील एका परिसरात राहते. इंदापूर येथील संशयित ऋषिकेश माळी याने इंस्टाग्राम या सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितेशी ओळख वाढवली. यानंतर फेसबुक तसेच व्हाट्सअपच्या माध्यमातून मॅसेज आणि फोन करून पीडितेशी जवळीक साधून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. यानंतर पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर धामणी येथील शेतात तसेच तासगाव येथील लॉजवर वारंवार अत्याचार केले.
sangli-crime-news-a-young-woman-in-sangli-was-tortured-on-the-pretext-of-marriage-she-was-cheated-of-rs-12-lakhs
यानंतर संशयित माळी याने विश्वास संपादन करून दहा लाख 28 हजार 698 रुपये आणि 2 लाख 71 हजार 302 रुपयांचे दागिने घेतले. यातील एक लाख रुपये परत दिले आणि इतर पैसे देण्यास टाळाटाळ केली. सदरचा प्रकार हा जून 2023 ते जानेवारी 2025 या कालावधीत घडला. यानंतर पीडितेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित ऋषिकेश माळी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.