rajkiyalive

jain aarthik vikas mahamandal : सरकारचे अभिनंदन परंतु दिगंबर जैन समाजास महामंडळात स्थान हवे

jain aarthik vikas mahamandal : सरकारचे अभिनंदन परंतु दिगंबर जैन समाजास महामंडळात स्थान हवे : जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन परंतु यामध्ये दिगंबर जैन समाजास मोठ्या प्रमाणात संधी मिळाली पाहिजे, नाहीतर या महामंडळ स्थापनेचा काहीही उपयोग होणार असल्याचे प्रतिपादन दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांनी केले.

jain aarthik vikas mahamandal : सरकारचे अभिनंदन परंतु दिगंबर जैन समाजास महामंडळात स्थान हवे

यावेळी भालचंद्र पाटील म्हणाले, राज्य सरकारने गुरूवारी जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली आहे. परंतु ही घोषणा करताना दिगंबर समाजास विश्वासात घेतले नाही. पश्चिम महाराष्ट्रात आणि राज्यात दिगंबर जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे. दक्षिण भारत जैन सभा या समाजाचे प्रतिनिधीत्व करते. कोल्हापूर जिल्ह्यातही दिगंबर जैन समाजाचे दोन आमदार असून, त्यांनाही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे येणार्‍या काळात या महामंडळाच्या यशस्वीतेसाठी दिगंबर समाजास विश्वासात घ्यावे लागेल.

ते पुढे म्हणाले, मुळात जैन समाज हा अल्पसंख्याक आहे. शेतीवर या समाजाची गुजरान चालते. दिगंबर जैन समाजाला महामंडळ स्थापन करतेवेळी विचारात घेणे गरजेचे होते. त्याप्रमाणे त्याची रचना करावी लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रत तर दिगंबर जैन समाज मोठ्या प्रमाणात आहे. दक्षिण भारत जैन सभेतर्फे आम्ही मुख्यमंत्र्यांन पत्र लिहिले असून, दोन आमदारांनीही याबाबत पुढाकार घेवून समाजास योग्य न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज