yelavi news :येळावीत लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यावर : राज्य शासनाने विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेतून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहेत, मात्र तासगाव तालुक्यातील येळावीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये लाडक्या बहिणीचे पैसे चक्क भावाच्या खात्यात जमा झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
yelavi news :येळावीत लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यावर
जिल्हा बँकेच्या शाखेत भाऊ-बहीण हातघाईवर
खात्यावर आलेली पैसे काढण्यावरून बँकेच्या शाखेत भाऊ-बहीण हातघाईवर आले. त्यावेळी बँकेच्या अधिकार्यांनी दोघांमध्ये समन्वय साधत वाद शमवण्याचा प्रयत्न केला, याबाबतची चर्चा जिल्हा बँकेत रंगली आहे.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 21 ते 65 वय असलेल्या कुटुंबातील सर्व महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीनंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत येताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ’लाडकी बहीण योजना’ कायम राहणार असल्याचे जाहीर केले. लाडकी बहिण योजनेची रक्कम निवडणुकीनंतर ही महिलांच्या खात्यावर जमा होत आहे.
जिल्ह्यातील काही महिलांचे उशिरा अर्ज प्राप्त झाल्याने त्यांच्या मंजुरीनंतर पंधराशे रुपये खात्यावर जमा होत आहेत. योजनेचे पैसे राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जमा होत आहेत. सर्व महिलांचे पैसे जमा होत असताना यामधील एका महिलेने माझे पैसे का जमा झाले नाहीत, याबाबतची खात्री जिल्हा बँकेच्या शाखेत जाऊन केली.
yelavi-news-dear-sisters-money-in-yelavi-brothers-account
संबंधित महिलेने लाडकी बहीणचे रक्कम जमा झाले आहे का? अशी विचारणा बँकेकडे केली. त्यानंतर त्या बहिणीच्या भावाच्या खात्यावर लाडकी बहीणची रक्कम जमा झाल्याचे बँकेच्या अधिकार्यांनी सांगितले. हा प्रकार समजतात तापलेल्या बहिणीने थेट भावाला फोन लावला. लाडकी बहीणचे पैसे तुझ्या खात्यावर जमा झाले आहेत. तू लगेच बँकेत ये, असा निरोप धाडला. त्यानंतर काही वेळात त्या महिलेचा भाऊ बँकेत आला. माझे पैसे तुझ्या खात्यावर कसे जमा झाले, असा जाब भावाला विचारला. दोघांमध्ये हमरी-तुमरी झाली.
संबंधित शाखेच्या अधिकार्यांनी दोघांना शांत करीत दोन्ही खात्याबाबतची माहिती घेतली. त्यावेळी लाडकी बहिणीचा अर्ज भरताना चुकीची कागदपत्रे दिल्याने हा प्रकार घडला. बँकेच्या अधिकार्यांनी तुम्हीच चूक केल्याचे सांगितल्यानंतर वादावर पडदा पडला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



