sangli grampanchat news : सांगली जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण सोडत 23 एप्रिल रोजी : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे. 2025 ते 2030 या कालावधीसाठी 696 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी दि. 23 एप्रिल रोजी सोडत काढली जाईल. दहा तालुक्याच्या ठिकाणी एकाच दिवशी सोडत होणार आहे. जुने आरक्षण बाजूला ठेवून उर्वरित प्रवर्गातून सोडत पद्धतीने चिठ्ठया काढल्या जाणार आहेत. संबधित तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नियमावतील तरतूदीनुसार करण्यात येईल. आरक्षण सोडतीत गावचा कारभारी कोण होणार? हे ठरणार असल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे.
sangli grampanchat news : सांगली जिल्ह्यातील सरपंचपदाचे आरक्षण सोडत 23 एप्रिल रोजी
जिल्ह्यातील 696 ग्रामपंचायतींसाठी दहा तालुक्याच्या ठिकाणी सोडत
जिल्ह्यामधील 696 गा्रमपंचयतींसाठी सन 2025 ते 2030 या कालावधीसाठी सरंपचपदाचे आरक्षण संबंधित तालुक्याच्या तहसिलदार कार्यालयामध्ये काढले जाईल. तालुक्यामधील एकूण ग्रामपंचायतीच्या बाबतीत सरपंच आरक्षण काढण्यासाठी संबधित उपविभागीय अधिकार्यांना पर्यवेक्षीय करण्यासाठी तसेच संबधित तहसिलदारांना आरक्षण काढण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
सरपंच पदासाठी आरक्षण काढताना मागील आरक्षणाचा विचार केला जाईल. आरक्षण एकाच दिवशी पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. तसेच सदरचे आरक्षण संबधित तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी नियमावतील तरतूदीनुसार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिले आहेत.
गेल्या दहा वर्षांतील आरक्षण वगळून अन्य प्रवर्गात संधी मिळणार आहे. तालुकानिहाय कोणत्या प्रवर्गाला किती, महिला किती याचा तक्ता तयार आहे. त्यानुसार तालुक्यात आरक्षण निश्चित केले जाईल. 2022 मध्ये झालेल्या झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये थेट जनतेतून सरपंच निवड करण्यात आली आहे, आगामी निवडणुकांत थेट सरंपच निवडला जाणार आहे. जिल्ह्यात 696 ग्रामपंचायती असून त्यासाठी 23 एप्रिलला आरक्षण सोडत काढली जाईल. आरक्षण सोडतीत 50 टक्के महिला आरक्षण राहणार आहे. यामध्ये 350 सरपंचपद महिला राखीव असल्याने या सर्व ग्रामपंचायतींवर यानंतर महिलाराज राहील.
sangli-grampanchat-news-reservation-for-sarpanch-post-in-sangli-district-to-be-released-on-april-23
जत तालुक्यात सर्वाधिक 116 ग्रामपंचायतींचा समावेश आहे, याशिवाय वाळवा तालुक्यात 94 याशिवाय शिराळा 91, तासगांव 68, मिरज 64, कवठेमहांकाळ 59, आटपाडी 53, कडेगाव 54, पलूस 33 ग्रामपंचायती आहे. दहा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडत होईल. गेल्या काही वर्षापासून आरक्षणामुळे संधी न मिळाल्याने सर्वसाधारण गटातील इच्छुकांचे काय होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायती 696
सर्वसाधारण सरपंच संख्या 420
ओबीसी सरपंच संख्या 188
अनुसूचित जाती संख्या 83
अनुसूचित जमाती संख्या 5
महिला सरपंच संख्या 349

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.