rajkiyalive

samdoli news : समडोळीत ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकर्‍याला 12 लाखाचा गंडा

samdoli news : समडोळीत ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकर्‍याला 12 लाखाचा गंडा:  मिरज तालुक्यातील समडोळी येथील एका शेतकर्‍याला ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने तब्बल 11 लाख 70 हजारांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर फसवणुकीची घटना हि 31 ऑगस्ट 2020 ते 30 जून 2024 या कालावधीत समडोळी येथे घडली.

samdoli news : समडोळीत ऊस तोडणी मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकर्‍याला 12 लाखाचा गंडा

बीडच्या मुकादमावर गुन्हा दाखल.

या प्रकरणी कुशाबा रामचंद्र मस्कर (वय 49 रा. समडोळी) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्‍या हरीश उर्फ हरिश्चंद्र बाजीराव जाधव (रा. नाडगाव जि. बीड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, कुशाबा मस्कर हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहतात. समडोळी परिसरातच त्यांची शेती आहे. संशयित मुकादम हरिश्चंद्र जाधव याच्याशी 2020 मध्ये मस्कर यांची ओळख झाली होती.ओळखीचा फायदा उचलून जाधव याने 13 जोडी उडतोडणी मजूर पुरवतो असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर मस्कर यांच्याकडून 31 ऑगस्ट 2020 रोजी 11 लाख 70 हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही संशयित जाधव याने ऊस तोडणी मजूर पुरविले नाहीत.

samdoli-news-farmer-duped-of-rs-12-lakhs-on-the-pretext-of-providing-sugarcane-harvesting-labour-in-samdoli

मस्कर यांनी संशयित जाधव यांच्याकडे वारंवार विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. तसेच पैसेही परत देण्याचे नाव घेईना. अखेर आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मस्कर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित हरिश्चंद्र जाधव याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज