danoli murdar news : दानोळीत खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यावसायिकाचा खून : येथील तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय 40) याचे सोमवारी (दि.13) रात्री नऊ वाजता अज्ञातांनी अपहरण केले. अपहरणानंतर भरतच्या मोबाईल वरूनच चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर आज (दि.14) बारा वाजता त्या तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली.
danoli murdar news : दानोळीत खंडणीसाठी अपहरण केलेल्या व्यावसायिकाचा खून
शेरीमळा रस्त्यावर उसामध्ये गाडी आणि चप्पल आढळून आले
याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री नऊ वाजता तरुण व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा (वय 40) यांचे अज्ञातांनी अपहरण केले. अपहरणानंतर भरत च्या मोबाईल वरूनच चुलत भावाला फोन करून 25 लाख रुपये घेऊन येण्यास सांगितले. दरम्यान, ग्रामस्थांनी जयसिंगपूर पोलीस ठाणे गाठत घटनेची माहिती दिली.
आलेले फोनचे रेकॉर्डिंग ऐकवली पण फक्त मिसिंग घेऊन उद्या बघू, असे सांगितले. यावर ग्रामस्थांनी स्वतः पोलीस पाटील प्रशांत नेजकर यांना सोबत घेऊन शोधाशोध केली. तेव्हा शेरीमळा रस्त्यावर उसामध्ये भरतची गाडी आणि चप्पल आढळून आले. त्या ठिकाणी दुसर्या व्यक्तीचा एक मफलर आणि नाईट बूट आढळून आले. तेथे झटापट झाल्याचेही जाणवत होते.
दुपारी बारा वाजता त्याच ठिकाणापासून शंभर फुटावर भरतचा मृतदेह सापडला. ओठावर व तोंडावर मारहाण झाल्याच्या खुणा होत्या. याप्रकरणी दोन संशितांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, डीवायएसपी ठाकूर आणि आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










