jain samaj news : कसबे डिग्रजमध्ये सोमवार 28 पासून विधान आराधना महोत्सवा प्रारंभ: मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज येथे आदिनाथ दिगंबर जिनमंदिर आणि शांतीनाथ दिगंबर जिनमंदिरच्यावतीने सोमवार 28 एप्रिलपासून श्री बृहत गणधरवलय महामंडल विधानास सुरूवात होत आहे. या विधानसाठी आगम चक्रवर्ती निर्यापक श्र्रमण विद्यासागरजी महाराज यांचे ससंघ गावामध्ये आगमन झाले. गावामध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
jain samaj news : कसबे डिग्रजमध्ये सोमवार 28 पासून विधान आराधना महोत्सवा प्रारंभ
गावामध्ये विविध ठिकाणी रस्त्यांचे काम सुरू असून, अनेक ठिकाणी स्वागत कमानी, डिजिटल, पंचरंगी झेंड यामुळे गाव सजले आहे. येथील बागणवाटेवर भव्य आणि दिव्य असे मंडप उभारण्यात आले आहे. युवा उद्योजक पिंकू उर्फ प्रशांत अवधूत या दांप्मत्यांना इंद्र इंद्रायणीचा मान मिळाला आहे. नुकताच हळदीचाही मोठा कार्यक्रम झाला.
कसबे डिग्रज येथे बर्याच वर्षानंतर विधान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 एप्रिल ते 4 मे 2025 अखेर ही पूजा होणार आहे. आचार्य सन्मतीसागरजी महाराज यांचे परमशिष्य आगमचक्रवती विद्यासागरज महाराज, आगमसागरजी महाराज, प्रशांतसागरजी महाराज आदींचे आशीर्वाद यापुजेला लाभले आहे.
धनपती कुबेर महेश जंबू चौगुले, चक्रवर्ती राकेश रमेश फराटे, महायज्ञनायक प्रकाश आदीनाथ फराटे, ईशान्य इंद्र राजेेंद्र बापू दुधगावे, सुवर्ण सौभाग्यवती प्रियांका प्रकाश चौगुले, ध्वजारोहण सुरेश अनंत चौगुले, मंडप उद्घाटक तीर्थंकर एज्युकेशन सोसायटी, अखंड दीपस्थापना आण्णासो कुबेर चौगुले, मंगल कलश स्थापना आण्णासो कुबेर चौगुले, प्रथम दिन जलकंभ आणणे बाहुबली महावीर अवधूत, भरत आळतेकर, श्रेणीक पाटील, आदींनी सवाल धरले आहेत.
jain-samaj-news-vidhan-aradhana-festival-begins-in-digraj-town-from-monday-28th
विधान महोत्सवासाठी प्रतिष्ठाचार्य संदेश उपाध्ये, संगीतकार सुयोग पाटील दानोळी, बोलीसम्राट राजेंद्रजी जैन, रोहित पंडित आदी उपस्थित राहणार आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











