kolhapur accident news : व्हनूरजवळ बकरी वाहतूक करणारा ट्रक पलटी; 200 हून अधिक बकर्‍यांचा करुण अंत

SHARE:

kolhapur accident news : व्हनूरजवळ बकरी वाहतूक करणारा ट्रक पलटी; 200 हून अधिक बकर्‍यांचा करुण अंत : कागल-मुरगूड मार्गावरील व्हनूर (ता.कागल) गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास बकरी वाहतूक करणार्‍या एका ट्रकचा भीषण अपघात झाला. मुंबईहून गारगोटेरीकडे निघालेल्या या ट्रकमध्ये असलेल्या सुमारे 350 बकर्‍यांपैकी 200 हून अधिक बकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

kolhapur accident news : व्हनूरजवळ बकरी वाहतूक करणारा ट्रक पलटी; 200 हून अधिक बकर्‍यांचा करुण अंत

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात व्हनूरजवळील पुलाच्या अगदी जवळ झाला. पुलाजवळील तीव्र वळणावर ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटलेल्या वेगात ट्रक थेट पुलाच्या कठड्याला धडकला आणि पुढे तोल जाऊन रस्त्यावर पलटी झाला. अपघाताच्या भीषणतेमुळे ट्रकमधील बकर्‍या मोठ्या प्रमाणावर जखमी झाल्या आणि 200 हून अधिक बकर्‍यांचा जागीच मृत्यू झाला.

हा ट्रक कर्नाटकातील गारगोटेरीकडे निघाला असला, तरी या बकर्‍यांची अंतिम वाहतूक बेंगलोर येथे केली जात होती, अशी समोर आली आहे. बेंगलोरसारख्या मोठ्या शहरांमध्ये मटणाचे दर एक हजार रुपयांहून अधिक असल्याने महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात बकर्‍यांची वाहतूक केली जाते.

मात्र, या वाहतुकीत अनेकदा आरटीओ नियमांचे उल्लंघन केले जाते. अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. ट्रक पलटी झाल्यामुळे आतमध्ये दबलेल्या जिवंत बकर्‍यांना बाहेर काढण्यात आले आणि त्यांना दुसर्‍या वाहनातून पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आले.

या घटनेची नोंद कागल पोलिसांनी घेतली असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास पोलीस करत आहेत. या अपघातामुळे संबंधित बकरी मालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *