sangli bjp news : निवडणुकांच्या तोंडावर सांगलीत भाजपमधील गटबाजी उफाळली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा घेऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांना रिचार्ज केले. पण भाजपच्या ग्रामीण व शहरी पदाधिकार्यांमधील गटबाजी उफाळून येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर ही गटबाजी धोकादायक असल्याने भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) सम्राट महाडिक व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग हे पॅचअप करणार असल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यात भाजप पुन्हा नंबर वन करण्यासाठी ते प्रयत्न करतील.
sangli bjp news : निवडणुकांच्या तोंडावर सांगलीत भाजपमधील गटबाजी उफाळली
भाजपचे नूतन ग्रामीण व शहर जिल्हाध्यक्ष करणार पॅचअप
गेल्या दहा वर्षात जिल्ह्यात भाजपने दबदबा निर्माण केले आहे. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह अनेक ठिकाणी भाजपने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. 2014 च्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत भाजपने जागा जिंकली होती. 2019 ला ती कायम राखली. तर 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला अपयश आले. पण विधानसभेच्या निवडणुकीत जोरदार कमबॅक केले होते. जिल्ह्यात पक्षाचे दोनाचे चार आमदार झाले. त्यामुळे आता होणार्या जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत भाजपला आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी लढाई करावी लागणार आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून भाजपमधील ग्रामीण व शहरी भागातील गटबाजी उफाळून आली आहे.
सांगली विधानसभा मतदारसंघातून आ. सुधीर गाडगीळ इच्छूक नसल्याचे पत्र प्रसिध्द केले होते.
त्यावेळी पक्षाचे नेते शेखर इनामदार विधानसभेसाठी इच्छूक होते. पण ऐनवेळी आ. सुधीर गाडगीळ यांनी निवडून लढण्याचा निर्णय घेतला, पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळे शेखर इनामदार नाराज झाले. त्यांनी इतर पक्षाची संपर्क साधण्याचा देखील प्रयत्न केला. पण भाजपने त्यांची समजूत काढली आणि त्यांनी पुन्हा भाजपच्या प्रवाहात काम करण्याचा निर्णय घेतला. मात्र गेल्या पाच-सहा महिन्यांपासून भाजपमधील परिस्थिती बदलली आहे. पक्षामध्ये जोरदार गटबाजी सुरू आहे. माजी आमदार नितीन शिंदे, दिनकर पाटील देखील पक्षावर नाराज झाले आहेत. आ. सुधीर गाडगीळ यांच्या विरोधात ते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे शेखर इनामदार व आ. गाडगीळ यांच्यात अजूनही फिलगुड नाही. पक्षात असलेली ही गटबाजी उघडपणे डिजीटल फलकांवर जाहीर होत आहे.
गेल्या महापालिका निवडणुकीची सूत्रे शेखर इनामदार यांच्याकडे होती.
भाजपने त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ करत त्यांनी महापालिकेवर सत्ता आणली. त्यावेळी आ. सुधीर गाडगीळ व आ. सुरेश खाडे यांची साथ लाभली. पण आता आ. गाडगीळ व शेखर इनामदार यांचे बिनसले आहे. त्यामुळे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांना ही गटबाजी संपविण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. सम्राट महाडिक यांचा सांगलीशी चांगला संबंध आहे. भाजपच्या अनेक नेत्यांबरोबर त्यांची मैत्री आहे. प्रकाश ढंग व ते मिळून मिसळून काम करत आहेत. त्यामुळे महाडिक यांना हा वाद मिटवणे शक्य आहे.
तर दुसरीकडे ग्रामीण भागात म्हणजे पलूस-कडेगाव मतदासंघात देशमुख घराण्यातील वाद वाढत चालला आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी खा. संजयकाका पाटील यांच्या विरोधात भूमीका घेत खा. विशाल पाटील यांचा प्रचार केला होता. त्यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संग्रामसिंह देशमुख यांनी पृथ्वीराज देशमुख यांच्या निर्णयाविरोधात भूमीका घेतली. त्यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार खा. संजयकाका पाटील यांनी प्रचार केला होता. त्यामुळे देशमुख कुटुंबियात पहिली वादाची ठिणगी पडली. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पृथ्वीराज देशमुख व संग्राम देशमुख एकमेकांसमोर उभे राहिले. अनेकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी एकमेकांना आव्हानच दिले. पक्षाने त्यावेळी दोघांच्या भांडणात तिसरा म्हणून महाडिक यांना संधी दिली.
BJP factionalism erupts in Sangli ahead of elections
त्यानंतर माजी आमदार स्व. संपतराव देशमुख यांचा पुण्यस्मरण दिनी दोन्ही देशमुख कुटुंबियात वाद उफाळून आला. संग्रामसिंह देशमुख व पृथ्वीराज देशमुख यांनी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन स्व. संतपराव देशमुखांना अभिवादन केले. यावरून दोघांमध्ये सुरू असलेल्या संघर्ष जिल्ह्याला कळाला. भविष्यातील निवडणुकीत हा संघर्ष भाजप पक्षाला अडचणीचा असणार आहे. त्यामुळे भाजपचे नूतन जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांना देशमुख कुटुंबियातील संघर्ष मिटवावा लागणार आहे. सम्राट महाडिक हे युवा जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांच्याकडे असलेली क्षमता पाहून पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. त्यांना पक्षाचा झेंडा जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर फडकविण्याची संधी आहे. त्यामुळे भाजप अंतर्गत संघर्ष कमी करून पुन्हा एकदिलाची भाजप तयार करतील, अशी शक्यता कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
लोकसभेला झाली ती चूक आता नको…
लोकसभेच्या निवडणुकीत खा. संजयकाका पाटील यांच्या विरोधात असलेली पक्षातील गटबाजी उफाळून आली, अनेक जणांनी पक्ष विरोधात काम केले. त्यामुळे या निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेला झाले तसे होता कामा नये, असे भाषणात सांगितले आहे. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी व नेते लोकसभेची चूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत करणार नाहीत, अशी शक्यता व्यक्त करत आह

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.