rajkiyalive

jayant patil news : राजारामबापू पाटील कारखान्यास ’’सर्वोत्कृष्ठ सहवीज निर्मिती प्रकल्प’ पुरस्कार

jayant patil news : राजारामबापू पाटील कारखान्यास ’’सर्वोत्कृष्ठ सहवीज निर्मिती प्रकल्प’ पुरस्कार : देशातील सहविज निर्मिती प्रकल्पांचे प्रतिनिधित्व करणार्‍या को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने पुणे येथील शानदार सोहळ्यात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्यास ’’सर्वोत्कृष्ठ सहविज निर्मिती प्रकल्प’ पुरस्कारा ने सन्मानित करण्यात आले.

jayant patil news : राजारामबापू पाटील कारखान्यास ’’सर्वोत्कृष्ठ सहवीज निर्मिती प्रकल्प’ पुरस्कार

सहकार क्षेत्राचे अर्ध्ववू,को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय साखर महासंघाचे अध्यक्ष,राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील,राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी हा पुरस्कार स्विकारला. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी या समारंभास हजेरी लावत राजारामबापू साखर कारखान्या चे अध्यक्ष-उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे कौतुक केले. ऊर्जा क्षेत्रातील या पुरस्काराने कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे.

को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष प्रकाश साळुंखे-दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील (दादा),भारत सरकारच्या शास्त्रज्ञ डॉ.संगीता कस्तुरे,प्रतापराव पवार,विस्माचे अध्यक्ष बी. बी.ठोंबरे,दिनेश जगदाळे,नरेंद्र मोहन,संजय खताळ यांच्यासह सहकार क्षेत्रातील दिग्गज विभूती या समारंभास उपस्थित होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, संचालक प्रदीपकुमार पाटील,कार्तिक पाटील, शैलेश पाटील,दादासो मोरे,दिलीपराव देसाई, कार्यकारी संचालक आर.डी.माहुली,जनरल मॅनेंजर एस.डी.कोरडे,जनरल मॅनेंजर विजय मोरे,को-जन मँनेजर उमेश सुतार प्रामुख्याने उपस्थित होते.

jayant-patil-news-rajarambapu-patil-factory-gets-best-cogeneration-project-award

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात,देशात यशस्वी घौडदौड करीत वसंतदादा इन्स्टिट्यूट व राज्य साखर संघाचे अनेक पुरस्कार पटकाविले आहेत. कारखान्याचे संचालक मंडळ,सभासद,ऊस उत्पादक शेतकरी व कामगारांच्या सांघिक प्रयत्नांचे हे यश आहे. अशी भावना अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज