rajkiyalive

kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव रिक्षाच्या धडकेत मुलीचा झाला मृत्यू :

kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव रिक्षाच्या धडकेत मुलीचा झाला मृत्यू : : मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये भरधाव वेगात जाणार्‍या रिक्षाने धडक देवून गंभीर जखमी केलेल्या दोघा बहिणींपैकी एकीचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सदरचा अपघात हा रविवार 11 रोजी सायंकाळी पाऊणे सात वाजण्याच्या सुमारास कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावर झाला. छकुली विकास भंडारे (वय 11, रा. कवठेपिरान) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून अश्विनी विकास भंडारे (वय 3 रा. कवठेपिरान) ही जखमी झाली आहे.

kavtepiran news : कवठेपिरानमध्ये भरधाव रिक्षाच्या धडकेत मुलीचा झाला मृत्यू :

तीन वर्षीय मुलगी गंभीर

पोलिसांनी याप्रकरणी रिक्षाचालक सुकुमार राजाराम भोसले (वय 66, रा. आंबेडकर चौक, दुधगाव, ता. मिरज) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत विकास वसंत भंडारे (रा. कवठेपिरान) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, विकास भंडारे हे मूळचे आष्टा येथील रहिवाशी असून सध्या ते मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावात असणार्‍या वडगावे यांच्या गोठ्यानजीक राहतात. फिर्यादी विकास भंडारे हे मजुरीचे काम करतात. त्यांच्या दोन लहान मुली छकुली आणि अश्विनी या दोघी रविवारी सायंकाळच्या सुमारास कवठेपिरान ते दुधगाव रस्त्यावरील जहांगीर मुजावर यांच्या दुकानासमोरील रस्ता ओलांडत होत्या.

kavtepiran-news-girl-dies-after-being-hit-by-speeding-rickshaw-in-kavtepiran

नेमक्या त्याच वेळी कवठेपिरान येथून दुधगावकडे भरधाव वेगात निघालेल्या अ‍ॅपे रिक्षाने (क्र. एमएच 10 सीक्यू 2436) त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये दोघीही गंभीर जखमी झाल्या. उपस्थितांनी तातडीने जखमी दोघींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचार सुरु असताना त्यातील छकुली हिचा मृत्यू झाला तर अश्विनी भंडारे हिच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी विकास भंडारे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज