karamvir patsanshta news : कर्मवीरच्या सहा संचालकांचा स्वच्छेने राजीनामा : कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेच्या सहा संचालकांनी स्वच्छेने राजीनामा दिला आहे. संस्थेच्या हिताला बाधा येऊ नये, वाद अधिक वाढू नये म्हणून राजीनामा दिला असून तो मंजूरही झाला आहे, राजीनाम्याबाबत सुरू असलेल्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन माजी संचालकांनी सभासद, ठेवीदार आणि कर्जदारांना केले आहे.
karamvir patsanshta news : कर्मवीरच्या सहा संचालकांचा स्वच्छेने राजीनामा
सभासदांनी अफवांवर विश्वास ठेवू नये ः माजी संचालकांचे आवाहन
माजी चेअरमन तथा संचालक रावसाहेब पाटील, डॉ.अशोक सकळे, वसंतराव नवले,एस. बी. पाटील, चेतन पाटील, अमोल रोकडे या संचालकांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संस्था स्थापनेपासून अनेक वर्षे त्यांनी संचालक म्हणून काम करत विविध पदांची जबाबदारी पार पाडली आहे.
1987 साली स्थापन झालेल्या या पतसंस्थेच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात मुख्य कार्यालयासह 68 शाखा कार्यरत आहेत. सध्या संस्थेकडे सुमारे 1245 कोटी रुपयांच्या ठेवी असून 980 कोटी रुपयांचे कर्जवाटप झाले आहे.
संस्थेचे लेखापरीक्षण नियमितपणे सहकार खात्याकडून होत असून प्रत्येक वर्षी अहवाल सर्वसाधारण सभेत मंजूर केला जातो. 31 मार्च 2025 अखेर संस्थेचा एनपीए 1.84 टक्के असून ढोबळ नफा 26.64 कोटी रुपये असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जुलै 2025 मध्ये नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची नियुक्ती झाली असून ते सक्षमपणे काम करीत आहेत. मात्र काही व्यक्तींनी संचालक पद मिळविण्याच्या हेतूने चुकीची माहिती पसरवून संचालक अपात्र असल्याचा आरोप केला, असा दावा माजी संचालकांनी केला आहे.
आमच्यापैकी कोणाचेही कर्ज थकीत नाही. उलट मार्च 2026 अखेर काही कर्ज खात्यांची परतफेडही करण्यात आली आहे. तरीही खोटी माहिती पसरवून सभासद आणि ठेवीदारांमध्ये गोंधळ निर्माण केला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










