madan patil news : मदनभाऊ गटाचा अजितदादांकडे कल

SHARE:

madan patil news : मदनभाऊ गटाचा अजितदादांकडे कल : काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जयश्रीताई पाटील यांनी राजकीय दिशा ठरविण्यासाठी घेतलेल्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची मागणी केली. मदनभाऊ गटातील कार्यकर्त्यांचा कल अजितदादाकडे गटाकडे असला तरी भाजपचा पर्यायही खुला आहे. दरम्यान कार्यकर्त्यांनी जयश्रीताई पाटील यांना निर्णयाचे अधिकार दिले असून त्यांनी कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे येत्या आठ दिवसांत भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

madan patil news : मदनभाऊ गटाचा अजितदादांकडे कल

कार्यकर्त्यांना वार्‍यावर सोडणार नाही ः जयश्रीताई पाटील

कळंबी येथे मदनभाऊ गटातील निष्ठावंत कार्यकर्ते, माजी नगरसेवकांची बैठक जयश्रीताई पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीला विष्णूअण्णा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील, जिल्हा बॅँकेचे माजी संचालक प्रा. सिंकदर जमादार, माजी महापौर किशोर शहा, सर्वोदय शिक्षण संस्थेचे कार्यवाह आनंदराव पाटील, सुभाष यादव, माजी महापौर कांचन कांबळे, माजी नगरसेवक प्रशांत मजलेकर, संतोष पाटील, प्रकाश मुळके, प्रशांत पाटील, करण जमादार, रोहिणी पाटील, वर्षा निंबाळकर, उत्तम साखळकर, युनूस महात, कय्यम पटवेगार, विजय पाटील, रवी खराडे, चेतन पाटील, पिंटू पाटील, मदनभाऊ पाटील युवा मंचेचे अध्यक्ष आनंद लेंगरे, शितल लोंढे, उदय पाटील उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीवेळी मदनभाऊ गटाच्या नेत्या जयश्री पाटील यांनी काँग्रेसविरोधात बंडखोरी केली. त्यांचे पक्षातून निलंबन करण्यात आले. त्यानंतर हा गट कोणती राजकीय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांकडून भूमिका जाहीर करण्याचा दबावही पाटील यांच्यावर होता. त्यानुसार गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेवून चर्चा केली.

Rs 1500 for the month of May has started being deposited in the accounts of beloved sisters

मदनभाऊंच्या निधनानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. त्यांच्या एकाही कार्यकर्त्यांचा वार्‍यावर सोडणार नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषद व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना ताकद देणार आहोत. येत्या आठ ते दहा दिवसात सर्वांना विश्वास घेऊन कार्यकर्त्यांच्या हिताचा निर्णय घेऊ, अशी ग्वाही जयश्रीताई पाटील यांनी दिली. यावेळी महापालिका क्षेत्रातील प्रभाग, मतदारसंघातील स्थितीवरही चर्चा करण्यात आली.

जयश्रीताई घेतील तो निर्णय कार्यकर्त्यांना मान्य

मदनभाऊ गटातील अनेक कार्यकर्त्यांनी जयश्रीताई पाटील यांच्यासमोर मते मांडली. काही कार्यकर्त्यांनी भाजपसोबत तर काहींनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षात जाण्याबाबत मत मांडले. पण अंतिम निर्णय जयश्री पाटील यांनीच घ्यावा. त्यांचा निर्णय मान्य असेल, असेही कार्यकर्त्यांनी जाहीर केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *