- 🔥 “हे मंत्री भिकाऱ्यांपेक्षा नीच आहेत; सभागृहातून लाथाडून हाकलले पाहिजेत!” — राजू शेट्टींचा संतप्त घणाघात 🔥🌾
“शेतकऱ्यांच्या मरणावर नाचणारे मंत्री, सभागृहात पत्ते खेळणारे नीच लोक — हे मंत्री नाहीत, हे शेतकऱ्यांच्या काळजावर घाव घालणारे भस्मासुर आहेत. यांना पाय धरून नाही, तर लाथाडून बाहेर फेकायला हवं!” — असं सांगत राजू शेट्टींनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिलं.
शेतकऱ्याच्या नशिबात जन्माला येणं म्हणजे दररोज थोडं थोडं मरत राहणं. माती फाडून, रक्ताचे थेंब झिरपवून जे बी पेरतो, ते उगवेल की नाही याची खात्री नाही. जे उगवतं ते खावं की विकावं, भाव मिळेल की पुन्हा तोंडात माती जाईल, याचीही खात्री नाही. आणि या मातीत जगणाऱ्या माणसांच्या वेदना ऐकायला, त्यांचा हक्काचा लढा लढायला जे विधानसभेत बसलेत, ते मात्र मोबाईलवर रमी खेळतायत?
हे बघून काळीज जळतं. अंगावर काटा येतो.
शेतकऱ्याचा मुलगा भुकेनं रडतो, बाप दोरीच्या गाठीत अडकून प्राण सोडतो, आई कर्जातनं पिळवटली जाते — आणि मंत्री मात्र सभागृहात पत्ते मांडतात?

ही बेइमानी नाही, ही थेट पाप आहे! शेतकऱ्यांच्या लाचार स्थितीवर थुंकणं आहे! आणि ही थुंकी पुसायची असेल, तर अशा मंत्र्यांना पाय धरून नाही, लाथ मारून बाहेर काढायला हवं — असं राजू शेट्टींनी ठणकावून सांगितलं.
“मंत्र्यांना लाथाडून हाकललं पाहिजे. भिकाऱ्यांपेक्षाही हे मंत्री नीच आहेत, कारण भिकारी तरी नम्रपणे हात पसरतो; हे तर शेतकऱ्यांच्या कणाकणावर नाचतात!”
सत्ताधारी सांगतात — कर्जमाफीचं पैसे नाहीत, खतं नाहीत, बी बोगस निघालं तरी काही करू शकत नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू शकत नाहीत. पण स्वतःचे मोबाईल मात्र भरभरून रिचार्ज करतात, कॅरम आणि रमी खेळायला वेळ मिळतो.
मग हे काय? हे शेतकऱ्यांच्या हाडांच्या राखेवर जत्रा नाही का? हे त्यांच्या मरणाच्या चितेवर नाचणं नाही का?
किती दिवस बघत बसायचं? किती दिवस गप्प राहायचं?
आज जर या मंत्र्यांना सभागृहातून ओढून बाहेर काढलं नाही, तर उद्या शेतकऱ्यांच्या मरणाला तुम्हीच जबाबदार असाल.
हे मंत्रिपद म्हणजे शेतकऱ्यांच्या श्रमाच्या घामाने बांधलेलं आहे. हे खुर्चीवर बसून खेळ खेळायला नाही. म्हणूनच ह्या मंत्र्यांच्या हातून मोबाईल हिसकावून, त्यांच्या मानगुटीवर पकडून, त्यांना दरवाजाबाहेर फेकून दिलं पाहिजे.
जोपर्यंत हे होत नाही, तोपर्यंत विधानसभेचं पवित्र सभागृह आणि शेतकऱ्यांची मातीतली सोन्यासारखी माणसं दोन्हीही अपवित्र राहतील.
आता वेळ आली आहे — “शेतकऱ्यांच्या नशिबाचे पत्ते मंत्री लोकांच्या हातून खेळले जाणार नाहीत… कारण आता आम्हीच त्यांचे पत्ते फाडणार!” — असं राजू शेट्टी ठणकावून सांगतात.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











