hupri murdar news : आईच्या हाताची नस कापून चेहर्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; हुपरीत पोटच्या पोराने जन्मदात्यांना संपवलं : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हुपरी शहरातील महावीरनगर परिसरात पहाटेच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. जन्मदात्या मुलानंच आपल्या वृद्ध आई-वडिलांचा निघृणपणे खून केला विजयमाला नारायण भोसले (वय 70) आणि नारायण गणपतराव भोसले (वय 78) या वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला.
hupri murdar news : आईच्या हाताची नस कापून चेहर्यावर वार, बापाच्या डोक्यात काठीने प्रहार; हुपरीत पोटच्या पोराने जन्मदात्यांना संपवलं
खून केल्यानंतर संशयित मुलगा सुनील (वय 48) स्वतःहून हुपरी पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी सुनिल नारायण भोसले (वय 48) याला ताब्यात घेतले आहे.
आईच्या हाताची नस कापली, वडिलांच्या डोक्यात काठीने वार
प्राथमिक तपासात संशयित सुनीलने अत्यंत थंड रक्ताने खून केल्याचे समोर येत आहे. आई विजयमाला यांच्या हाताची नस काचेसारख्या धारधार वस्तूने कापली. चेहर्यावर काचेच्या तुकड्याने वर्मी घाव घातले. वडील नारायण भोसले यांच्या डोक्यात काठीने वार केला.
या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. खूनामागे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कौटुंबिक वाद, मानसिक तणाव किंवा अन्य कोणते कारण आहे का, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. घटनेची माहिती मिळताच हुपरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक एन. आर. चौखंडे, सहाय्यक निरीक्षक विक्रम शिंदे यांच्यासह पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
फॉरेन्सिक लॅबचे पथकही घटनास्थळी पोहोचून पुरावे संकलित करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण हुपरी शहरात हळहळ व्यक्त होत असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदनानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
मात्र, कारण काहीही असो, आई-वडिलांवर हात उचलण्यापर्यंत परिस्थिती कशी आणि का गेली, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. रक्ताच्या नात्यातील हा रक्तरंजित शेवट समाज म्हणून आपण कुठे जात आहोत, याचा गंभीर विचार करायला भाग पाडणारा आहे. कोल्हापुरात काही महिन्यांपूर्वी जन्मदात्या आईचे काळीज चिरून हत्या केल्याची घटना घडली होती.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











