sandhya death news : ’पिंजरा’ सिनेमा फुलवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

SHARE:

sandhya death news : ’पिंजरा’ सिनेमा फुलवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन : मराठी चित्रपटसृष्टीतील ‘पिंजरा’ हा एक आयकॉनिक आणि अविस्मरणीय चित्रपट मानला जातो. या चित्रपटात आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचे निधन झाले आहे. त्या 87 वर्षांच्या होत्या.

sandhya death news : ’पिंजरा’ सिनेमा फुलवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन

‘पिंजरा’ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री संध्या शांताराम जी यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’ आणि विशेषत: ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात राहील.

1959 मध्ये प्रदर्शित झालेल्या व्ही. शांताराम यांच्या ‘नवरंग’ या चित्रपटातून अभिनेत्री संध्या शांताराम यांनी आपल्या अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांना चकित केले. अरे जा रे हट नटखट हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे आजही तेवढेच लोकप्रिय आहे. संध्या शांताराम यांचे मूळ नाव विजया देशमुख होते. या गाण्यासाठी त्यांनी खास शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळी कोणतेही नृत्यदिग्दर्शक नसल्याने, गाण्यात दिसणार्‍या सर्व स्टेप्स संध्या यांनी स्वतः किंवा दिग्दर्शक व्ही. शांताराम यांनी तयार केल्या होत्या.

हे गाणे आगळेवेगळे बनवण्यासाठी शांताराम यांनी सेटवर खरे हत्ती आणि घोडे आणले होते. अशा वातावरणात नाचणे अत्यंत धोकादायक असतानाही, संध्या यांनी निर्भयपणे परफॉर्म केलं. प्राणी आवाज आणि गर्दीमुळे अस्वस्थ होऊ शकतात हे माहीत असूनही त्यांनी कोणतीही भीती न बाळगता शूटिंग केले. त्यांनी बॉडी डबल वापरण्यास नकार दिला आणि शूटिंगपूर्वी त्या प्राण्यांशी मैत्री करत स्वतःच्या हातांनी त्यांना केळी-नारळ खाऊ घातले आणि पाणी पाजले होते. त्यांचे हे समर्पण आणि धाडस पाहून व्ही. शांताराम प्रभावित झाले.

विवाहित असूनही शांताराम यांना संध्या यांच्या तेजस्वी व्यक्तिमत्त्वाने आणि प्रखर प्रतिभेने भुरळ घातली. त्यानंतर संध्या यांनी शांताराम यांच्या अनेक नामांकित चित्रपटांत काम केले. ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘पिंजरा’ आणि ‘अमर भूपाळी’ यांसारखे चित्रपट त्यांचे आणि शांताराम यांच्या कलात्मक सहकार्याचे प्रतीक ठरले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *